पोस्ट्स

गावाळी म्हणजे काय ?

गावाळी म्हणजे काय ? गावाळी म्हणजे उत्तर कोकणातील प्रचलित प्रथा, गावदेवीचा उत्सव, मटणाचा प्रसाद, "केळवा-माहीम" ह्या विषयाचा एकही व्हिडिओ यूट्यूब वर किंवा माहिती फेसबुकवर उपलब्ध नाही म्हणून व्हिडिओ जरूर बघा आणि मजकूर पण नक्की वाचा. उत्तर कोकणातील एक प्रचलित प्रथा, जी अनादी काळापासून चालत आली आहे, काही गावांत अजून मोजक्या उत्साही प्रतिनिधींनी जिवंत ठेवली आहे तर काही निरुत्साही गावांत मृत झाली आहे. ह्या प्रथेत अंधश्रद्धा वैगरे काही नाही. आपण जे बकरे खाटीकाकडून कापून घेतो ते न कापता आपल्या गावातील ग्राम देवतेपुढे कापतो, एवढाच काय तो फरक. इथे कोणाचा जोर नाही, कुणाची जबरदस्ती नाही, ज्याला पटेल त्यानी यावे आणि ज्याला पटत नाही त्यांनी या उत्सवात भाग घेऊ नये हा साधा नियम. प्रत्येक गावाला ग्रामदैवत लाभलेले असते. काही गावात मोठी मंदिर तयार झाली आहेत. या ग्रामदेवतेची वर्षानुवर्ष पूजा करणे, सेवा करणे अशी कामे गावातील प्रमुख कुटुंबाकडे सोपवली आहेत. बहुतेक करून गावातील पाटीलच यांचा मान बाळगत आले आहेत, म्हणून या देवाच्या आजूबाजूची जमीन या कुटुंबाला दिलेली असते. जेणेकरून त्यांनी ती कसून पीक घ्...

घोडे पाणी नाळ आणि रिठ्याचे दार हे सह्याद्री पर्वत रांगेतील अत्यंत कठीण श्रेणीतील असे कोकण आणि देश यांना जोडणारी घाट वाट

नमस्कार मंडळी, मी घोडे पाणी नाळ ह्या जागेचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ बघितले होते, ह्या ठिकाणावर जायची ईच्छा होती, पण मुंबईतून या जागी जाणारी ट्रेकर मंडळी फार कमी. मनात असंख्य ईच्छा आहेत, भरपूर किल्ले घाट वाटा यांचा अभ्यास झाला पण वेळेचे गणित जुळून येत नाही, म्हणून जाताच येत नाही. काही घाट वाटा किंवा किल्ले असे असतात की जर संधी मिळाली तर ती हुकउ नये, आणि काहीपण करून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा हे मनात ठरवलेलं, अशातूनच घोडे पाणी नाळ या घाट वाटेचे ऑफबीट ट्रेकर्स पुणे येथील संस्था प्रयोजन करत होती. मी पण नक्की केले की ही घाट वाट करायचीच. पण एकच समस्या होतो मुंबईतून कसे पोहोचायचे, कारण ट्रेक सकाळी 6 वाजता चालू करायचा होता आणि त्या जागी सार्वजनिक वाहन जात नाही. मग काय मुंबईच्या माहिती असलेल्या ट्रेकिंग ग्रुप वर विचारले पण कोणी तयार झाले नाही. आत्ता होती पंचाईत, मग ठरवले आपणच मुंबईतून कार घेऊंन निघावे पण मग कल्याण येथील Dr सुभाष पाठारी तयार झाले आणि त्यांच्याच गाडीतून कल्याण वरून रात्री प्रवास चालू केला. नियोजित टोकावडे गावी आम्ही रात्रीच पोहोचलो, पण पुण्याकडून येणारी मंडळी पोहोचल...

श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी

नमस्कार मंडळी, आजची सफर एक अध्यात्मिक स्थानाला भेट देण्यासाठी आखली होती, श्री गगनगिरी महाराज मठ, मनोरी हे गाव तसे मुंबई जवळचेच आहे पण सोयी सुविधांपासून आणि शहरिकरणा पसून अजून अवगत झाले नाही. कारण ह्या गावाला पोहोचण्यासाठी रस्त्यानं भाईंदर येथून जाता येते पण ते सोयीस्कर होत नाही, मालाड इथून मर्वे समुद्र किनारा इथून बोटीने मनोरी या गावात पोहोचता येते. हा सफर अगदी रंजक आहे, अगदी मोजकी माणसे, बोटीचा प्रवास आणि ऐका अनोख्या गावात प्रवेश. इथे बहुतेक कोळी समाजाची माणसे राहतात, मुख्य व्यवसाय माशेमारी, शेती, आणि आता गरजेनुसार रिसॉर्ट हा व्यवसाय फोफावताना दिसतो आहे. मनोरी गावातून मठाला जाण्यासाठी 1 किलोमीटर चालत रस्त्याने किंवा रिक्षाने जाऊ शकता. हा सगळा परिसर जंगल सदृश्य आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. मठात पोहचताच तिथे मोफत गाडी पार्किंगची व्यवस्था आहे, एक छोटे हॉटेल देखील आहे, चहा नाश्ता उपलब्ध होऊ शकतो. मठातील ऐका जागेवर गगनगिरी महाराजांची मोठी प्रतिमा स्थापन केलेली आहे, इथे त्यांची पूजा अर्चना केली जाते. समोरच. हवन कुंड आहे, इथे सत्संग आणि हवन नियमित होत असते. आज मात्र फक्त आम्...

"दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड परिक्रमा" छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली अनोखी मानवंदना

"दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड परिक्रमा" छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली अनोखी मानवंदना नमस्कार मंडळी, रायगड परिक्रमा ही भरपूर ट्रेकर मित्रांच्या अनुभवातून समजली होती, पण ती करण्याचा योग येत नव्हता, शेवटी आमचे ट्रेकर मित्र श्री शरद बचूटे यांनी एक दिवस सकाळी सकाळी फोन केला, STF ने रायगड परिक्रमा मोहीम आखली आहे, मी लगेच तारीख बघितली आणि घरातून अनुमती घेतली, कारण या मोहिमेसाठी जवळ जवळ 24 तास लागणार होते, मुंबई ते मुंबई असे. STF हा ग्रुप माझ्यासाठी नवीन होता, नाव भरपूर गाजलेले पण, कोण आयोजित करतो, कसे संपर्क करायचे हे माहिती नव्हते, शेवटी श्री संदीप कुथवळ यांच्याशी संपर्क केला आणि मोहीमेला येतो हे कन्फर्म केले. तसे संदीप सरांबरोबर आधी एक ट्रेक झाला होता, पण तसा परिचय मोजकाच होता,असो. पुढे जायचे कसे, कुठे भेटायाचे हे गणित जुळत नव्हते, तेव्हा STF ने ठरवलेला मीटिंग पॉइंट हा निजामपूर गावातून जात होते, माणगाव पुढे 10 किलोमीटर. ट्रेकर मंडळींनी भरपूर शोधाशोध करून सांगितले की बोरिवली ते उंबरडी एसटी बस आहे, रात्री 12 वाजता ती सकाळी 6-7 दरम्यान निजामपूर गाठेल. मुंबई वरून आम्ही तीन जण होतो...

मुंबई वरून केलेला जुन्नर प्रवास आणि पुढे हटकेश्वर ते लेण्याद्री केलेला रेंज ट्रेक "ऑफ बीट ट्रेकर" सोबत

नमस्कार मंडळी, हा ट्रेक आम्ही नोव्हेंबर महिन्यातच केला होता, पण काही कारणामुळे आपण त्यानंतर केलेले व्हिडिओ आधी रिलीज केले आणि मग तब्बेतीच्या कारणास्तव मी व्हिडिओ एडिटिंग आणि फोटो एडिटिंग मध्ये उशीर केला. आपले अजून भरपूर व्हिडिओ येतील, पण तब्बेतीमुळे थोडा अजून वेळ लागणार आहे, त्याबद्दल क्षमस्व 🙏 ऑफ बीट ट्रेकर्सने हटकेश्वर ते लेण्याद्री असा ट्रेक करायचा असे ठरवले होते, ते पुण्याहून आणि मी मुंबईतून येणार असे ठरले. हा ट्रेक आम्ही TTMM या तत्त्वावर केला होता. सोबत कोणी येते का असे आमच्या TTMM ट्रेक ग्रुप पर विचारले असता उदासीनता दिसली, असो हे चालायचेच. कसे जायचे याचा विचार आणि अभ्यास झाला. सल्ला मासलत झाली, भरपूर जणांनी ग्रुप वर माहिती दिली. शेवटी मी आणि सुजित यांनी मुंबई सेंट्रल वरून रात्री शेवटची जुन्नर एसटी बस १२ च्या सुमारास आहे, ती पकडुन सकाळी जुन्नरला ७ वाजता पोहोचलो. एसटी उशिराच पोहोचली कारण बोरघाट १ तास बंद होता.  तिथून लेण्याद्री साठी थेट बस नाही पण लेण्याद्री फाट्यावर जाण्यासाठी बस आहे ती पकडली, पुढे २-३ km साठी आम्हाला लिफ्ट मिळाली ती पकडुन लेण्याद्री डोंगराखाली पोहोचलो. वात...

यादव कालीन शिरगाव किल्ल्याची सफर

नमस्कार मंडळी🙏 शिरगाव हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही, कारण शिरगाव हे नाव महाराष्ट्रातील भरपूर गावांचे आढळते. पण आज आपण भेट देणार आहोत ती पालघर मधील सातपाटी गाव जवळील एका समृद्ध गावाला. पालघर जिल्ह्यातील, शिरगाव हे गाव समुद्र किनारी वसलेले आहे, इथे बहुतेक बागायती शेती केली जाते, नारळी फोफळी, केळी, दुधी, अळू, कांदे, भात शेती हा प्रामुख्याने केलेला व्यवसाय. ह्या जागेचे भौगोलिक आणि सागरी वैशिष्ट बघून देवगिरीच्या यादवांनी इस १२२५ साली बांधला, पण नंतर हा किल्ला भरपूर राजवटींच्या अधिपत्याखाली राहिला आणि जशी राजवट तशी किल्ल्याची सौरचना बदलली गेली, सगळ्यात शेवटी हा किल्ला इंग्रजांनी वापरला होता आणि त्यात गरजेनुसार बदल केले गेले. किल्ल्याचे वैशिट्य हे की इथे बहुमजली इमारती होत्या, आत्ता फक्त ढासळलेले अवशेष बाकी आहेत. या किल्ल्यात एक दुर्मिळ तोफ सुस्थितीत आढळते. किल्ल्यात त्याकाळातील एक सौच कुप पण आढळतो. इथे पोर्तुगीज लोकांचा वावर होता आणि त्याकाळात साऊथ आफ्रिका देशातून आणलेला वेडा माड ह्या किल्ल्यात आणि अजू बाजूला त्याची उत्पत्ती झालेले आढळते. ह्या किल्ल्याला ५ बुरुज असून त्यात एक बुरुज हा अष्ट...

जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण

जय गिरनारी, गिरनार शिखर यात्रा, श्री दत्त गुरू पादुका आणि अखंड धुनीचे दर्शन, १० तास अविरत १०००० पायरींची चढण आणि उतरण नमस्कार मंडळी🙏 मागच्या भागात आपण श्री क्षेत्र सोमनाथ आणि वेरावल यात्रेबद्दल सविस्तर माहिती मिळवली आणि आज आपण वेरावल येथून रात्री ११ वाजता जुनागढसाठीच्या प्रवासाला सुरुवात केली. जुनागढ रेल्वे स्थानकात आपण १ वाजता पोहोचलो, इथे भयाण शांतता होती, आम्हीच चौघे जण ट्रेन मधून उतरलो, अगदी रामसेंच्या सिनेमात दाखवतात तसे, रामसेच्या सिनेमा मध्ये जसे भुटिया स्थानक असते तसे, कारण इथे बहुतेक सगळी मंडळी दिवसा प्रवास करून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याच्या तलेटी गावासाठी रिक्षा मिळाली. तलेटी मध्ये पोहोचल्यावर मोठी पंचाईत झाली, आपण ठरवलेल्या हॉटेल मध्ये जागा उपलब्ध नव्हती. रात्री १.३० वाजता हॉटेलची शोधाशोध सुरू झाली. सगळी हॉटेल, धर्मशाळा, आखाडे पालथे घातले पण कुठेही जागा शिल्लक नव्हती. शेवटी एक हॉटेल मालक शेवटची शिल्लक रूम विकण्याच्या प्रतीक्षेत होता, मी जाताच क्षणी तो बोलला शेवटची रूम आहे, लवकर नक्की करा, मी रूम बघून येई पर्यंत दुरे गिऱ्हाईक समोर तयार होते, मी रूम नक्की केली, ...